पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा, तर जम्मू आणि काश्मीर हा भारताचा भाग राहील असे वक्तव्य जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी केले. भारत आणि पाकिस्तानला काश्मीर प्रश्न सोडवायचा असेल तर तो चर्चेनेच सोडवावा लागेल असेही ते म्हणाले.
पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानात आहे आणि पाकिस्तानातच राहील, तर जम्मू आणि काश्मीर हा भारताचा भाग असून तो भारतातच राहील, हे आपल्याला समजण्चाची गरज आहे असेही ते एएनआय या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.