नवी दिल्ली- काश्मीर हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानने वेळोवेळी घेतलेल्या वादग्रस्त भूमिकेमुळे दिवसेंदिवस भारत-पाकचे संबंध ताणले जात असून, याचा परिणाम म्हणून भारताने पाकिस्तानातील भारतीय मुत्सद्दय़ांच्या मुलांबाबत ‘नो स्कूल गोइंग मिशन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानात असलेल्या भारतीय मुत्सद्दय़ांनी पाकिस्तानातील शाळांमधून आपल्या मुलांची नावे कमी करून त्यांना भारतात परत पाठवावे अशी सूचना भारतीय उच्चयोगाने पाकिस्तानातील मुत्सद्दय़ांना केली आहे.