बंगळुरू विशेष न्यायालयाच्या निर्णयामुळे जयललिता आमदार म्हणून अपात्र ठरल्या आणि त्यांना मुख्यमंत्रिपदही गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ पक्षाची रविवारी सायंकाळी चेन्नईमधील पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली आणि जयललितांकडून आलेल्या सूचनेनुसार पन्नीरसेल्वम यांची निवड करण्यात आली होती. विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पन्नीरसेल्वम यांनी आपल्या ज्येष्ठ सहकार्यांसह राजभवन येथे जाऊन राज्यपाल के. रोसय्या यांची भेट घेतली आणि त्यांना निवडीबाबतचे पत्र दिले होते. अखेर आज त्यांना राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.