पाकव्याप्त काश्मीरमध्ये सभा घेऊन सईदने भारताविरोधात दहशतवादी कारवाया तीव्र करण्याची धमकी दिली. ‘आठ लाख भारतीय जवान काश्मीरमध्ये नरसंहार घडवत असताना आपल्या सुरक्षेसाठी त्यांना पठाणकोटसारखे हल्ले करण्याचा अधिकार नाही का?’, असा चिथावणीखोर सवाल सईदने केला. सईदने पठाणकोट हल्लची जबाबदारी घेणार्या सईद सलाउद्दीन या दहशतवाद्याचीही स्तुती केली. त्यावेळी भारताविरोधात जमावाकडून घोषणाबाजी करण्यात आली. काश्मीरला स्वातंर्त्य मिळेपर्यंत लढाई सुरूच राहणार. आम्ही जिहादसाठी तयार आहोत, असे नारे जमावाने दिले. काश्मीरचे स्वातंर्त्य हे आमचे लक्ष्य आहे, असे सांगत सईदने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही जमावाला भडकवले.