पाकिस्तानातील पेशावर येथे लष्कराच्या शाळेवर तालिबानंनी केलेला हल्ला क्रूरपणाचा कळस असून बेसावध असताना निष्पाप जीवांचा बळी घेणारा भ्याडपणा हल्लेखोरांनी केला आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
तसेच या हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या दु:खात सहभागी असल्याची भावना देखील मोदींनी व्यक्त केली, तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीदेखील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत जगभरातील दहशतवादाविरुध्द खंबीरपणे एकत्रितपणे उभे राहून लढा देण्याचे आवाहन केले.