नरेंद्र मोदी अलीबाबा आणि त्यांचे मंत्री 40 चोर-ओमप्रकाश सिंह

गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (15:57 IST)
अखिलेश सरकारचे मंत्री ओमप्रकाश सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाण साधताना सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना अली बाबा आणि त्यांच्या मंत्र्यांना चाळीस चोर म्हटले आहे. असे विधान काही पहिल्यांदाच झालेले नाही आहे, या अगोदर देखील मंत्रीने लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मोदींबद्दल आपत्तीजनक विधान दिले होते.  
 
चंदौली जिल्ह्यात समाजवादी पक्षाचे माजी विधायकाच्या पुण्यतिथी कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना ओमप्रकाश यांनी म्हटले होते की मोदींनी देशातील गृहमंत्री आणि त्यांचा मुलाला बेइमान घोषित केले आहे. भाजपचे लोकं फारच खराब आहे. त्यांनी म्हटले की मोदी साहेब  विवाहित होते, पण ही बाब त्यांनी सर्वांपासून लपवून ठेवली. हे तर निवडणुकीच्या वेळेस फार्म भरताना कळले की त्यांची बायको ही आहे. तसेच ओमप्रकाश यांनी मीडियावर हल्ला करत म्हटले की सर्व चांगले काम करण्याचा ठेका फक्त मोदींनीच घेतला आहे का? यूपी सरकार चांगले काम नाही करत का? यूपी सरकार म्हणत आहे की सूबेच्या 43 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडला आहे पण मोदी गुजरातचा चश्मा लावून यूपीकडे पाहत आहे आणि म्हणतात की यूपीत कुठे दुष्काळ आहे.  
 
लोकसभा निवडणुकीत असे विधान केले होते : मोदीची आपण म्हणता की सांड कंट्रोलमध्ये राहत नाही. तुम्हाला आम्ही लोक कंट्रोलमध्ये करून देऊ तेव्हा तुम्हाला हे निश्चितच कळेल की दिल्ली अद्याप किती दूर आहे. जे मनात येत ते बोलतात, पागल झाले आहे. त्यांनी म्हटले की मोदींना येवढा माज आला आहे की हिंदुस्तान त्यांच्या घराचे आहे. आपला संसार तर सांभाळता आला नाही आता देश सांभाळायला चालले आहे. जेव्हा सूरदासच्या डोळ्यांचे ऑपरेशन केले असते तेव्हा त्याचे डोळे फुटणे निश्चितच होते, आणि जर वाचले असते तर ती देवाची मर्जी.

वेबदुनिया वर वाचा