दहशतवाद्यां विरोधातील लढा सुरूच राहील- आदित्यनाथ

भारतीय जनता पार्टीचे खासदार योगी आदित्यानंतर त्यांच्या ताफ्यावर रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर, हा दहशतवाद्यांनी केलेला हल्ला असल्याचे
आदित्यनाथ यांचे म्हणणे असून, असून आपण अशा हल्ल्यांना मुळीच भीक घालत नसून, यापुढेही आपण दहशतवादा विरोधात आपला लढा लढतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

उत्तर प्रदेशातील आझमगड येथे आदित्यनाथ यांनी दहशतवाद विरोधात एका सभेचे आयोजन केले होते, या सभेसाठी जात असताना त्यांच्या
ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

वेबदुनिया वर वाचा