पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केल्यानंतर काही वेळातच हा हल्ला झाला. स्वतंत्र भारतात हिंसा आणि अत्याचाराला अजिबात थारा नाही. हा देश दहशतवाद, नक्षलवाद, माओवादासमोर झुकणार नाही. सर्वांनी सामान्य, आनंदी आयुष्य जगावं, यासाठी विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं, असं आवाहन मोदींनी केलं. दरम्यान, हिंसाचारामुळे मागील 38 दिवसांपासून काश्मीर खोऱ्यातील अनेक जिल्ह्यात कर्फ्यू आहे.