...तर पाकला सडेतोड उत्तर

मंगळवार, 28 जुलै 2015 (10:20 IST)
देशाभिमानाला आव्हान दिले जात असेल कोणालाही सडेतोड उत्तर दिले जाईल, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

गुरदासपूरच्या दहशतवादी हल्ल्याबाबत मंगळवारी संसदेत निवेदन देणार असल्याचे सांगून ते म्हणाले, भारताला पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवायचे असताना सीमेपलीकडून दहशतवादी घटना कायम का ठेवल्या जात आहे, हे कळायला मार्ग नाही. आम्हाला शांतता हवी आहे, तथापि देशाभिमानाची किंमत चुकवून नाही, असे त्यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले. आम्ही पाकिस्तानवर पहिल्यांदा हल्ला करणार नाही, पण आम्हाला आव्हान दिले जात असेल तर सडेतोड उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा