...तर जनतेसाठी पुनर्जन्म घेईल- ममता बॅनर्जी

शनिवार, 19 एप्रिल 2014 (12:29 IST)
मालदाममधील मी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. त्या हॉटेलातील माझ्या खोलीत आग लागणे, षडयंत्र असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

ममता म्हणाल्या, माझा असा प्रकारे मृत्यू झाला तरी मी जनतेसाठी पुनर्जन्म घेईन,' हॉटेलच्या खोली अचानक लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे.

दरम्यान, ममता बॅनजी या मालदा जिल्ह्यात प्रचारासाठी गेल्या असता. एका खासगी हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबल्या होत्या. मात्र अचानक त्यांच्या खोलीतील एसीमधून धूर बाहेर येऊ लागला. त्यानंतर खोलीत आग पसरली. ममताना सुरक्षारक्षकांनी सुरक्षित बाहेर काढले होते.

वेबदुनिया वर वाचा