घातकी देश पाकिस्थानला एक धक्का दिल्यावर भारतीय लष्कराने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. आपले नागरिक सुरक्षित राहावेत आणि योग्य तो दबाव निर्माण व्हावा म्हणून पाकिस्तानच्या सीमेरेषेपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजाबमधील काही गावे रिकामी करण्यात आली आहेत. तर या गावातील सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या भागात सीमा सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवस भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.