केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे हेलिकॉप्टर झारखंडमधील नक्षली भागात भरकटल्याची घटना घडली. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राजनाथ प्रचारासाठी आले असता ही घटना घडली. एअर ट्रॅफिक कंट्रोलने (एटीसी)सिग्नल न दिल्यामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. गृहमंत्री राजनाथ यांचे हेलिकॉप्टर नक्षल प्रभावित भागात जवळपास आठ मिनिटे घिरटया घेत होते.
सिंहभूम जिल्ह्यातील बडाजामदा येथे सभेत संबोधित करणार होते. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टरला जवळपास 8 मिनिटे एटीसीने कोणताही सिग्नल दिला नाही. वैमानिकाने एटीसीला संपर्क साधन्याचा खूप प्रयत्न केला. अखेर त्याने रांची एअरपोर्टला अलर्ट दिल्याचे अधिकार्यांची चांगलीच धांडली उडाली.