यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्ला चढवत काँग्रेस इतिहासजमा होईल म्हटले आहे. मोदी म्हणाले, ‘आता लोकांचे मनपरिवर्तन झाले आहे. आम्ही मुलींसाठी शाळांमध्ये टॉयलेटची व्यवस्था केली. गरिबांसाठी बँकांचे दरवाजे उघडले. पंतप्रधान मोदींचे गुरू स्वामी दयानंद गिरी हृषीकेशमध्ये राहतात, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते आले होते.
गुरुवारी, भोपाळमध्ये विश्व हिंदी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी कार्यकर्तशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. काँग्रेसने पावसाळी अधिवेशन चालू दिले नाही असा आरोप त्यांनी केला.
शुक्रवारी, हृषीकेशमध्येही त्यांनी पुन्हा काँग्रेसवर हल्ला केला. हे सकारात्मक राजकारण नसल्याचे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत काँग्रेस नामशेष होईल असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, लोक म्हणतील एक काँग्रेस पक्ष होता.