गुड़गांवात राहणारी अदिति आर्याच्या डोक्यावर फॅमिना मिस इंडियाचे ताज सजले आहे. मुंबईच्या यशराज स्टुडियोत झालेल्या या मिस इंडियाच्या फिनालेत बरेच राउंड झाले आणि बाजी मारली गुड़गांवच्या अदितीने. अदितीचे मिस इंडिया बनल्यानंतर गुड़गांवात तिजे शेजारी फारच उत्साहात दिसले. तिचे शेजारी राजेश बलवानचे म्हणणे आहे की अदिति शांत स्वभावाची मुलगी आहे आणि सर्वांमध्ये मिसळून राहते. त्यांच्या मुली अदिती आणि तिच्या बहिणीच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.
उशिरा रात्रीपर्यंत चालणार्या या इवेंटच्या ज्यूरीत मनीषा कोइराला, जॉन अब्राहम, शिल्पा शेट्टी, अनिल कपूर सारख्या ख्यातमान व्यक्ती होते. फॅमिना मिस इंडियाच्या माध्यमाने फक्त सुंदरताच नव्हे तर संपूर्ण पर्सनॅलिटीला जज करण्यात येते कारण मिस वर्ल्ड कॉनटेस्टमध्ये मिस इंडिया भारताला रिप्रेजेंट करते.