श्रीनगर- गेल्या 51 दिवसांपासून काश्मीर खोर्यात लागू असलेली संचारबंदी आज उठविण्यात आली आहे. श्रीनगर आणि पुलवामा येथील काही क्षेत्रात लोकांच्या एकत्र होण्यावर बंदी राहील. मात्र, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यासह श्रीनगरमधील एम. आर. गुंज आणि नोहट्टा पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत अद्याप संचारबंदी कायम आहे.