कोटय़वधींच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी सीबीआय चौकशीला सामोरे गेलेले आसामचे माजी पोलीस महासंचालक (माजी डीजीपी) शंकर बरुआ यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. बरुआ यांनी स्वत:कडे असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. शंकर बरुआ यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांची नव्वद वर्षाची आई घरातच दुसर्या खोलीत होती.