गेल्या वर्षी सुमारे वर्षापूर्वी अपहरण झालेल्या दोन भारतीय शिक्षकाची सुटका लिबिया या देशातून करण्यात आली आहे.भारताच्या विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती द्विटरवरून दिली आहे .यामध्ये अपहरण झालेले टी गोपालकृष्ण (आंध्र प्रदेश) आणि सी बलरामकिशन (तेलंगना) यांचा समवेश होता. लिबियामधील सिर्ते विद्यापीठात हे दोघे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वर्षी २९ जुलै २०१५ मध्ये त्यांचे अपहरण झाले होते. त्यांचे अपहरण ‘आयएसआयएस’च्या दहशतवाद्यांनी केले होते.