आगामी 48 तासात राज्यात पावसाचे पुनरागमन

सोमवार, 6 जुलै 2015 (09:40 IST)
मुंबई- पावसाची वाट पाहणार्‍या राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेले काही दिवस मराठवाड्यासह राज्याच्या महत्त्वाच्या भागांमध्ये दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.
 
कर्नाटक ते केरळदरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचा प्रभाव कमी झाल्यामुळे पाऊस अरबी समुद्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोकणातील काही भागांसह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी पाहायला मिळाल्या.

वेबदुनिया वर वाचा