हार्दिक पटेल म्हणाले, की आम्ही दिल्लीमध्ये कोणत्याही मंत्र्याला भेटायला आलेलो नाही. राजकीय पक्षांना आमच्या आंदोलनात स्थान नाही. आम्ही दिल्लीत भविष्यातील रणनीती ठरविण्यासाठी आलो आहोत. जाट आणि गुर्जर समुदायाच्या नागरिकांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. आम्ही आमचे आंदोलन देशभर पोचविणार आहोत. पटेल समुदायाला जे काही आवश्यक आहे, ते मी करण्यास तयार आहे. आमची 27 कोटी लोकसंख्या असून, आम्ही आरक्षणाच्या मागणीवर सर्वजण एक आहोत.