पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हे प्रतिपादन केले की अरूणाचल प्रदेश हा यापूर्वीही भारताचा आविभाज्य भाग होता व यापुढेही राहील. चीनने आपल्या भौगोलिक नकाशात अरूणाचल प्रदेशचा समावेश केला असला तरी त्यामुळे सत्य बदलणार नाही, असे सिंग म्हणाले.
अरूणाचल प्रदेशच्या विद्यार्थी शिष्टमंडळाने काल पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी सिंग यांनी ही ग्वाही दिल्याची माहिती शिष्टमंडळाचे अध्यक्ष तुकाम टातुंग यांनी दिली.
शिष्टमंडळाने अरूणाचल प्रदेशच्या नागरिकांना स्टेपल्ड व्हिसा देण्याच्या चीनच्या धोरणाबाबतही चर्चा केली. ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन सिंग यांनी दिले. अरूणाचल प्रदेश देशापासून वेगळा राहणार नाही, अशी माहिती ही पंतप्रधानांनी दिली.