देशाच्या अनेक भागात पाणी टंचाई आणि उष्णतेचा सामना नागरिकांना करावे लागत आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून 2025 बाबत चांगली बातमी दिली आहे. हवामान विभाग म्हणाले, या वर्षी देशभरात सामान्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळच्या किनाऱ्यावर धडकतो आणि नंतर सात ते आठ दिवसांत महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात, विशेषतः मुंबईमध्ये पोहोचतो. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, 2025 पर्यंत मान्सून वेळेवर येण्याची अपेक्षा आहे.