मिळालेल्या माहितीनुसार आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबई विधानभवनात आश्वासन समितीची बैठक झाली. ज्यामध्ये मिठी नदीच्या खोलीतील घोटाळा, कचरा हटवणे, सुरक्षा भिंतीचे काम या प्रकरणाचा विषय समोर आला. त्यावर रवी राणा संतप्त झाले आणि त्यांनी कंत्राटदाराची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
आमदार रवी राणा यांनी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी दिलेल्या कंत्राटात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना मिठी नदी स्वच्छ करण्यासाठी आणि नदीशी संबंधित इतर गोष्टींसाठी १८५ कोटींचा ठेका देण्यात आला होता. या कंत्राटात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आले आहे.
राणा पुढे म्हणाले की, अधिकारी ८ दिवसांत समितीला चौकशी अहवाल देतील. सरकारने यासाठी १९ आमदारांची समिती स्थापन केली आहे. सर्व आमदार मिठी नदी संकुलाला भेट देतील. स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली किती काम झाले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आमदार करतील. संपूर्ण घोटाळा लवकरच उघड होईल. उद्धव ठाकरेंना खूश करण्यात सहभागी असलेल्या बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल. दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल. तसेच रवी राणा म्हणाले, “महापालिकेतील सर्व घोटाळेबाज कंत्राटदार आदित्य ठाकरे यांचे जवळचे आहे.