महाराष्ट्रात पाळीव कुत्र्यावरुन शेजाऱ्यांमध्ये झालेला वाद पोहचला पोलीस स्टेशनमध्ये

गुरूवार, 12 सप्टेंबर 2024 (15:34 IST)
ठाण्यात पाळीव कुत्रा घरात आल्याने शेजाऱ्याने कुत्र्याच्या मालकाला खडसावले. इतकंच नाही तर दोघांमध्ये मारामारी देखील झाली आणि हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं.
 
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण आता कोर्टात देखील पोहचले आहे. एका पाळीव कुत्र्यावरून दोन शेजाऱ्यांची मारामारी झाली, कारण एका शेजाऱ्याचा कुत्रा दुसऱ्या शेजाऱ्याच्या घरात घुसला होता. हीच एक गोष्ट दोघांमध्ये वादाचे कारण बनली. आपापसात भांडण झाल्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आणि दोन्ही जणांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली.
 
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात घडलेल्या या घटनेबद्दल सांगण्यात येत आहे की, एक पाळीव कुत्रा मालकाच्या घरातून पळून शेजाऱ्याच्या घरात घुसला. यावरूनच दोन्ही कुटुंबात वाद झाला. गुरुवारी झालेल्या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ठाण्यातील अंबरनाथ परिसरात मंगळवारी ही घटना घडली, त्यानंतर दोन्ही शेजारच्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
 
कुत्र्याच्या मालकाने आपल्या कुत्र्याला सांभाळण्यासाठी त्याच्या नातेवाईकाकडे सोपवले होते, पण तो पळून जाऊन शेजाऱ्यांच्या घरात घुसला. त्यामुळे दोन्ही कुटुंबातील वाद वाढत विकोपाला गेला.
 
या कुत्र्याबाबत शेजाऱ्याने प्रश्न उपस्थित करून त्याची योग्य काळजी न घेतल्याने शेजाऱ्याकडे नाराजी व्यक्त केल्याने हा वाद वाढल्याचे परिसरातील सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांनी सांगितले. तसेच त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये कडाक्याचे भांडण आणि मारामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी कुत्र्याच्या मालकाने शेजाऱ्यांच्या घराचे दरवाजे तोडले.
 
तसेच दोन्ही शेजारच्यांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्याचे पोलीस अधिकारींनी सांगितले. मंगळवारी पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती