* तांदुळाच्या डब्यात नींबाची पाने, लसूणाच्या पाकळ्या किंवा हळदीचे तुकडे टाका. याने कीडे लागणार नाहीत. * भाजीत मीठ जास्त झाले तर भाजलेले तांदुळाचे पीठ टाका. * बटाटे उकळविण्यासाठी पाण्यात आधी सिरका टाका. * डोसा बनविताना तांदूळ भिजविताना त्यात मेथीचे दाणे टाका. किंवा थोडी तुरीची डाळ टाका. * कच्ची केळी आणि बटाटे कापताना पानी टाकून ठेवा. याने ते काळे पडणार नाहीत. * हिरव्या मटरचा रंग टिकविण्यासाठी ते उकळविताना त्यात एक चिमूटभर साखर टाका. * हिरव्या पालेभाज्या जास्त दिवस ताजे राहवेत यासाठी त्यांना प्रिजमध्ये ठेवताना त्यांना पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. * जवस आणि गव्हाचे कणीक सारख्या प्रमाणात घेऊन पोळ्या बनविल्याने चव छान लागते. * बदामाचे साल काढण्यासाठी बदाम एक मिनिट गरम पाण्यात भिजवून ठेवा. * फोडलेले नारळ ताजे राहवे यासाठी नारळाच्या आतील भागात थोडे मीठ घासून ते फ्रिजमध्ये ठेवा. याने नारळ लवकर वाळणार नाही. * भाज्यांना चांगली तरी आणण्यासाठी कांद्याच्या मसाला भाजताना दही टाका याने भाजीचा स्वादही वाढेल. * वडे बनविल्यानंतर सर्व्ह करण्याआधी त्याच्यावर काळे मीठ शिंपडा. वडे स्वादीष्ट बनतील. * चीज व्यवस्थित कीसायचे असेल तर आधी ते फ्रिजमध्ये ठेवा. * चींच किड्यांपासून वाचविण्यासाठी त्यात मीठ ठाकून एअर टाईट डब्यात ठेवा. * मिरची पुडाला जाळे लागू नये म्हणून त्यात जाड मीठाचे खडे ठेवा. * जॅम-जेली आणि मुरांबा यांना मुंग्या लागू नयेत म्हणून कपड्याच्या पट्टीला सरसोचे तेल लावून झाकणाच्या चारी बाजूंनी ही पट्टी लपेटून घ्या. * पुलाव बनविताना तांदळात गरम पाणी टाका. पानी आणि तांदुळचे तापमान सारखेच झाल्याने तांदुळ छान फुलतिल. * किसलेली लौकि, लाल भोपळा, किसलेले आवळे पाण्यात टाकल्याने त्यांची रंग तसाच राहतो. * लोणच्यात एक चमचा निंबू रस टाकल्याने लोणच्याची चव वाढते.