दह्यासारखं 'set' झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल पण...
 
	
		
			 
										    		शनिवार,  18 डिसेंबर 2021 (14:11 IST)
	    		     
	 
 
				
											थोडक्याच शब्दात जीवनातील आनंदाचे रहस्यच उलगडून दाखविले आहे.
	"शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं, खायचा मोह होतो.
	पण चमचा बुडवला की दही मोडणार, थोड्या वेळाने चोथापाणी होणार हे ठरलेलं !
	पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर ?
	At the end of the day, ते आंबट होऊन जाईल.
	अजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल.
	मग उपयोग काय त्या perfectly set झालेल्या दह्याचा ?
	 
	मनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं ... नाही का ?
	दह्यासारखं 'set' झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल !
	पण ते आयुष्य तसंच set राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल. सपक होईल..... वायाच जाणार ते.
	 
	त्यापेक्षा रोजच्या रोज आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.
	आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच ! आयुष्य जगायला तर हवंच !
	दिवसभर ते दही वेगवेगळ्या form मध्ये अनुभवायचं !
	कधी साखर घालून तर कधी मीठ, कधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत, तर कधी कोणत्या ग्रेव्हीत !
	
	कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून ! 
	मला ना, ह्या ताकाचा हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.
	
	अर्थात कुठचाही अतिरेक झाला तर आयुष्य पांचटच होतं !
	हरेक दिवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे.
	 
	मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा ! 
	पूर्ण दही संपवायच्या आधी, रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं !
	'उद्याचं' दही लावायला !
	
	मग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी, परत नव्यानं दही विरजायचं.
	
	मला ठाऊक आहे... रोज ही भट्टी जमेलच असं नाही. पण नासलंच समजा कधी, कडवट झालंच समजा कधी, तर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.
	 
	मग त्याकरता दुसर्याकडून विरजण मागायची वेळ आली... तरी त्यात कमीपणा नसतो.
	पण 'दही' मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं !
	आयुष्य कसं ' चवीनं ' जगायचं
	
	- सोशल मीडिया
