दिवसभरातल्या धावपळीत होणारा प्रदूषणाचा, रहदारीचा त्रास, बसमधल्या गर्दीचा घामट वास यामुळे अगदी त्रासून जायला होते. हा वास उबग आणणारा आहे. याप्रमाणेच गर्दीच्या किचकिचाटात स्वत:च्या अंगाला येणारा उग्र दर्पही नकोसा वाटतो. घरातला कुबटपणाही असाच जाचणारा. पण आता अँरोमा थेरपीतले मंद सुवास आपलेसे करून या त्रासापासून मुक्ती मिळवता येते.
घरातले कपडे, बेडशीट्स, चादरी धुताना साबण पावडरबरोबर निलगिरी किंवा लव्हेंडर तेलाचे काही थेंब घाला. त्याचा मंद सुगंध प्रसन्नता देतोच त्याचबरोबर त्यावर तयार होणारे जिवाणूही नष्ट होतात.