घराच्या सजावटीला मुख्य प्रवेशद्वारापासूनच सुरवात होते. कारण घराच्या प्रवेशद्वारातूनच आपण पाहुण्यांचे स्वागत करत असतो. घरात शुभ कार्य असल्यास आपण घराच्या दरवाज्यावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधतो. मात्र, आता सगळीकडे सिमेंटचे जंगल वाढल्याने शहरातून आंब्याची झाडे हद्दपार झाली आहेत. त्यामुळे घराच्या सजावटीसाठी बाजारात आलेल्या कृत्रिम तोरणांचा उपयोग करून घराच्या प्रवेशद्वाराचे सौंदर्य वाढविले जाते.