एक गृहस्थाचे पाच मुले होते. पण त्या भावंडाचे आपसात कधीच पटायचे नाही. त्यांच्यात सतत भांडण, वाद होत राहायचे. हे पाहून बाप दुखी असायचा. त्यांना अनेकदा उपदेश करूनही काही फरक पडला नाही तेव्हा एके दिवशी त्या गृहस्थाने आपल्या पाचही मुलांना आपल्या जवळ बोलावले. प्रत्येकाच्या हातात हातभर लांबीची एक-एक काठी देऊन ती मोडण्यास सांगितले. प्रत्येकाने वडिलांच्या आज्ञेप्रमाणे ती मोडली.