एकदा बिरबल आणि बादशहात कसल्या तरी मुद्यावरून वादावादी झाली. त्यामुळे बादशहा बिरबलावर रागावला. असे होताच बिरबलावर मनात जळणारा एक करीमखान नावाचा सरदार त्याला म्हणाला, ''बिरबलजी, खाविंद आता तुमच्यावर रागावल्याने ते उद्यापासून तुमचे मंत्रिपद काढून घेतील आणि तुम्हाला कुत्तेवान म्हणजे कुत्र्यांवरचा अधिकारी म्हणून नेमतील.''