पुणेरी डोके : महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक ?

कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकीलाला प्रश्न विचारले महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?
 
वकीलाने एकदम वकिली भाषेतच उत्तर दिले..
महाभारतामध्ये जमिनी बद्दल वाद होता (सिव्हील केस) तर रामायणा मध्ये अपहरणाची केस होती. (क्रिमिनल केस)

हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील प्रख्यात साहित्यकांना विचारला, तेव्हा त्यांच्याकडे अगदी मार्मिक उत्तर होते..
हरणाचं वस्त्र बनवण्या वरून झाले ते रामायण आणि वस्त्राचं हरण करण्यावरुन झाले ते महाभारत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती