भारतात तुळसीचे रोप अनेक शतकांपासून विशिष्ट स्थान मिळवून आहे. पुदीनादेखील भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय आहे. राजस्थान विद्यापीठातील 10 विद्यार्थ्यांनी तुळस आणि पुदीना यांच्यातील कॅन्सरविरोधी गुणांवर संशोधन केले आहे. संशोधन करणार्या संघाने उंदरांवर 6 महिने संशोधन केल्यानंतर ते या निष्कर्षावर पोहोचले की, तुळस आणि पुदिनामध्ये कॅन्सरविरोधी भरपूर गुण आहेत. या संशोधनामुळे अनपेक्षित निष्कर्ष निघाला आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगाचा या दोन्ही वनस्तीचा सकारात्मक परिणाम दिसला.
उंदरांना दोन गटात विभागले. त्यानंतर एका गयावर रासायनिक लेप लावण्यात आला, दुसर्या गटावर तुळस आणि पुदीनाचा लेप लावला. एका महिन्यानंतर पाहिले की, ज्या उंदरांवर तुळस आणि पुदीन्याचा लेप लावला नव्हता, त्यांच्या शरीरावरील अनेक जखमा कायम होत्या. या उलट ज्या उंदरांवर पुदीना आणि तुळसीचा लेप लावला होता. त्यांच्यवर 11 महिन्यानंतर अशा जखमा झाल्या. उघड आहे की, दुसर्या गटातील उंदरांची प्रतिकारकशक्ती वाढली.