कधी कधी आपला मूड छान लागलेला असतो, पण असे काही तरी ऐकण्यात येते, समोर घडते किंवा आठवते की त्यामुळे आपला मूड क्षणात बदलून जातो. आपण एकदम उदास होऊन जातो. मात्र ही मन:स्थिती दिवसभर टिकून राहणे योग्य नाही. या मन:स्थितीच्या बदलावर मात करून आपल्याला पूर्ववत आपली मन:स्थिती ताळ्यावर आणता आली पाहिजे आणि दिवस वाया गेला नाही पाहिजे.