निद्रानाश ही आताच्या काळाची गंभीर समस्या आहे. अनेक लोकं यापासून मुक्ती मिळवण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेयला सुरू करतात. कारण गोळ्या घेतल्यावर बेसुध झोप येते आणि उठल्यावर रिलॅक्स वाटतं. परंतू या गोळ्यांच्या आहारी जाणे कितपत योग्य आहे? या गोळ्यांने ताणापासून मुक्ती तर मिळते पण याचा आरोग्यावर काय प्रभाव पडतो हे माहीत आहेत का?
अधून- मधून झोपेच्या गोळ्या घेणं लाभदायक असलं तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेणं टाळावे. या गोळ्यांने झोपे संबंधी समस्या दूर होतात कारण या नर्व्ह सिस्टमला रिलॅक्स करतं, विशेषतः: त्या टॅबलेट्स ज्यात बेंजोडायजेपाइन आढळतं.
याव्यतिरिक्त ज्या गोळ्यांमध्ये नॉनबेंजोडिजेपाइन आढळतं त्याचे साइड इफेक्ट प्रोफाइल सेफ असतं, असे अलीकडील शोधात स्पष्ट झाले आहे. तसेच काही परिस्थितीत औषधांचा प्रभाव, लिव्हर आणि किडनीवर पडतो. म्हणून आपण मनाने या गोळ्या घेयला नको.