सध्या ज्यूसप्रेमींची संख्या वाढतेय. बाहेरून येताना एक ग्लास ज्यूस पिऊनच घरी परतणारे अनेकजण पाहायला मिळतात. मात्र आरोग्याच्या दृष्टीनं फळांचे रस घेणं चुकीचं आहे. अलीकडेच केंब्रिजमधील संशोधकांनी याकडे लक्ष वेधलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार फळांच्या रसात साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळेच आरोग्यावर दुष्परिणाम संभवतो.