कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात सुख-समाधानी व्हायचे असेल तर त्याला कष्टाबरोबरच भाग्याची साथ पाहिजे, असे म्हटले जाते. यासाठी मनुष्य भविष्याचा आधार घेत असतो. भविष्य पाहण्याचे विविध पर्याय आणि माध्यमे आहेत. त्यापैकी सहज आणि सोपी पद्धत म्हणजे हस्तरेषेवरुन भविष्य पाहणे, याला अधिक पसंती असते. हस्तरेषेमध्ये भाग्यरेषेला खूप महत्व आहे. ही रेष जेवढी सक्षम तेवढे तुमचे भविष्य सक्षम. म्हणूनच जाणून घेऊयात कुठे आणि कशी असते आपली भाग्यरेष...
भाग्यरेषेचे असे मिळते फळ :
पारंपरिक शास्त्रानुसार ज्या जातकाच्या हातामध्ये ही भाग्यरेष जितकी ठळक आणि लांब असते तितके त्याचे भविष्य उज्वल असते. मात्र, हीच भाग्यरेष जर फिकट असेल तर त्याचे भाग्य उज्वल असू शकत नाही किंबहूना अशुभ मानले जाते.
२ जर भाग्यरेष शनिपर्वतापासून ते मणिबंधापर्यंत असली तरीही ती तुटक तुटक असल्यास तुमचे भाग्य उज्वल नाही, असे समजावे. अशी तुटक-तुटक रेष वेळोवेळी तुमचे भाग्य सोडून देते, असे दर्शवते.