पण तुम्हाला माहित आहे का? देशभरात काही वटवृक्ष आहे जे शेकडो वर्षांपासून उभे आहे आणि अजूनही पूर्ण भव्यतेने अस्तित्वात आहे. वडाचे झाड हे भारतातील केवळ एक झाड नाही तर ते श्रद्धा, आयुर्वेद आणि पर्यावरणाचे प्रतीक आहे. चला तर मग भारतातील काही सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध वटवृक्षांबद्दल जाणून घेऊया.
गुजरात
गुजरातमधील आणंद जिल्ह्याजवळ वड तालुक्यात एक वडाच झाड आहे. या वडाच्या झाडाचे वय सुमारे ३०० वर्षे असल्याचे म्हटले जाते. इतके प्राचीन असल्याने, हे झाड स्थानिक समुदायासाठी एक आध्यात्मिक केंद्र मानले जाते. वट सावित्री पूजेला येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो.
प्रयागराज
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात संगम नदीच्या काठावर एक प्राचीन वटवृक्ष आहे. येथील वटवृक्षाचे नाव अक्षयवट आहे, जो अनादी काळापासून अस्तित्वात आहे असे मानले जाते. असे मानले जाते की या झाडाला फक्त पाहून पापांचा नाश होतो.