दूरसंचार ने शिरपेचात मनाचा तुरा खोवला!

सोमवार, 17 मे 2021 (19:03 IST)
कित्ती मोठी ही आहे उपलब्धी,
बोलू शकलो, कुठंही अन कधी,
एका तारेने बांधलो एकमेकांना,
अर्थ आला त्या निर्जीव तारांना,
मैलोनमैल च अंतर नाहीस क्षणात,
जागा मिळविता आली परस्परांच्या मनात,
कित्ती जणांना रोजगार सुद्धा मिळाला,
देशाच्या प्रगतीचा आलेख ही उंचावला,
दूरसंचार ने शिरपेचात मनाचा तुरा खोवला!
....अश्विनी थत्ते
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती