‘‘श्री रघुनाथ राव शिरढोणकर प्रामाणिक पत्रकार होते. त्यांनी एक उदाहरण प्रस्तुत केले होते. त्यांचे पत्र ‘हितचिंतक’चा ‘पानीपत अंक’ आजही मैलाचा दगड बनलेला आहे.’’ हे उद्गार होते श्री वि. गो. धर्माधिकारी यांचे. ते दुष्यन्त कुमार स्मारक पाण्डुलिपि संग्रहालयाच्या शिरढोणकर सभागृहात आयोजित र.वि.शिरढोणकरस्मृती समारंभात मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते.