भारताला 13 ऑगस्ट रोजी ढाका पोहोचायचे आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने 17आणि 20ऑगस्ट रोजी खेळले जातील, त्यानंतर संघ 23ऑगस्ट रोजी तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी चितगावला जातील. पहिला टी-20 सामना 26ऑगस्ट रोजी चितगाव येथे होईल. शेवटचे दोन टी-20 सामने 29 आणि 31 ऑगस्ट रोजी मिरपूर येथे खेळले जातील.
या दौऱ्यामुळे आशिया कप टी-20 च्या तयारीलाही मदत होईल. भारत या स्पर्धेचे यजमान आहे परंतु दोन्ही देशांमधील करारानुसार पाकिस्तान भारतात येणार नसल्याने ही स्पर्धा पूर्णपणे श्रीलंका, बांगलादेश किंवा युएईमध्ये होईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.