हा सामना बन्सीलाल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आता मुंबईने या क्वार्टर फायनल सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे आणि त्यात एकूण 18 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. या दोघांव्यतिरिक्त, मुंबईने श्रेयस गुरवच्या जागी हर्ष तन्नाचा संघात समावेश केला
मुंबई संघाला जम्मू आणि काश्मीरविरुद्ध 5 विकेट्सने आश्चर्यकारक पराभव पत्करावा लागला. त्यानंतर शार्दुल ठाकूरच्या मदतीने मुंबईने मेघालयविरुद्ध 'करो या मर' असा सामना जिंकला. या सामन्यात शार्दुलने एकूण 8 विकेट्स घेतल्या आणि 84 धावाही केल्या. चालू हंगामात, संघात स्टार खेळाडू असूनही मुंबई संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. संघात अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, सूर्यांश शेडगे आणि तनुश कोटियनसारखे खेळाडू आहेत.
रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबई संघ:
अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघ भटकळ, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुश कोटियन, मोहित अवस्थी , सिल्वेस्टर डिसोझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना.