ज्यामध्ये RCB ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ 14.1 षटकात 101धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, फिल साल्टच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने 10 षटकांत दोन गडी गमावून 106 धावा केल्या आणि सामना जिंकला.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने थेट अंतिम फेरीत प्रवेश गमावला असला तरी त्यांना आणखी एक संधी मिळेल. आता त्यांना क्वालिफायर-2 खेळायचे आहे. या सामन्यात त्यांचा सामना एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघाशी होईल. या हंगामातील एलिमिनेटर सामना शुक्रवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल, ज्यामध्ये विजेता संघ पंजाब किंग्ज विरुद्ध क्वालिफायर-2 खेळेल. हा सामना 1 जून रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल.
लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. काइल जेमीसनच्या चेंडूवर जोश इंग्लिसने विराट कोहलीला झेलबाद केले. तो 12 चेंडूत 12 धावा करू शकला. यानंतर मयंक अग्रवालला मुशीर खानने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तो 19 धावा काढून परतला. तथापि, फिल सॉल्ट क्रीजवर राहिला आणि त्याने फक्त 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 27 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 56 धावा काढल्या आणि नाबाद राहिला. तर, रजत पाटीदारने 15* धावा केल्या. पंजाबकडून काइल जेमिसन आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आयपीएल 2025 मध्ये प्लेऑफ आधीच सुरू झाले आहेत. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात क्वालिफायर-1 खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी आपल्या घातक कामगिरीने पंजाबला मोठा धक्का दिला. संघ 14.1 षटकांत 101 धावांवर सर्वबाद झाला. त्यांच्याकडून मार्कस स्टोइनिसने सर्वाधिक 26 धावा केल्या. तर, प्रभसिमरन आणि अझमतुल्ला उमरझाई 18-18 धावा करून बाद झाले. त्यांच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. आरसीबीकडून जोश हेझलवूड आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी तीन तर यश दयालने दोन विकेट घेतल्या. याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि रोमारियो शेफर्ड यांना प्रत्येकी एक यश मिळाले.यासह, पंजाब संघ आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात कमी षटके फलंदाजी करणारा संघ बनला आहे.