भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघाने 358 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंड संघाने 559 धावा केल्या आणि 311 धावांची आघाडी घेतली. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या.
चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात विकेट घेऊन जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या भूमीवर 50 कसोटी बळी पूर्ण केले आणि एक खास अर्धशतक पूर्ण केले. यानंतर, जेव्हा त्याने दुसरी विकेट घेतली तेव्हा त्याने इशांत शर्माची बरोबरी केली. आता बुमराह आणि इशांत भारतासाठी इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. दोघांनीही इंग्लंडमध्ये 51-51 कसोटी बळी घेतले आहेत.
जसप्रीत बुमराहने 2018 मध्ये भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.इंग्लंडपूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपली चमकदार गोलंदाजी दाखवली होती. आतापर्यंत त्याने 48 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 219 बळी घेतले आहेत, ज्यात 15 पाच बळींचा समावेश आहे.