IND vs ENG:भारत आणि इंग्लंडचे खेळाडू हातावर हिरव्या पट्ट्या घालून खेळत आहेत, कारण जाणून घ्या

बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 (17:51 IST)
भारत आणि इंग्लड यांच्यातील तीन सामन्यांचा एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आज अहमदाबादमधील नरेंद्रमोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. 

19फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताचा हा शेवटचा सामना आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू मनगटावर हिरवा पट्टी बांधून खेळत आहेत. याचे कारण म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अवयवदान उपक्रम आहे. 
ALSO READ: IND vs ENG: एकदिवसीय सामन्यात भारताने सलग १०व्यांदा नाणेफेक गमावली, अर्शदीपला संधी मिळाली,पंतला वगळले
बीसीसीआयने अवयवदान करा, जीव वाचवा हा उपक्रम सुरु केला आहे. भारत आणि इंग्लंडमधील खेळाडू या उपक्रमाला पाठिंबा देत आहे. या उपक्रमाचे नेतृत्व आयसीसीचे अध्यक्ष जय शहा करत आहे. बीसीसीआयच्या 'अवयव दान करा, जीव वाचवा या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू हातावर हिरव्या पट्ट्या घालून खेळत आहे. 

आयसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी सचिव जय शहा यांनी सोमवारी या उपक्रमाची घोषणा केली. 
"12 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, अवयवदान करा, जीव वाचवा, हा जागरूकता उपक्रम सुरू करताना आम्हाला अभिमान वाटतो," असे शाह यांनी इंस्टाग्रामवर लिहिले. 
ALSO READ: शुभमन गिलने एकदिवसीय सामन्यात शतक ठोकून मोठा विक्रम रचला
खेळामध्ये मैदानाबाहेरही प्रेरणा देण्याची, एकत्र येण्याची आणि कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्याची शक्ती असते. या उपक्रमाद्वारे आम्ही सर्वांना जीवनाची सर्वात मोठी देणगी देण्याच्या दिशेने एक पाऊल उचलण्याचे आवाहन करतो. एक संकल्प, एक निर्णय, अनेक लोकांचे प्राण वाचवू शकतो. चला एकत्र येऊया आणि फरक घडवूया! या उपक्रमाला विराटकोहली, शुभमन गिलसह अनेक खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: IND vs ENG: भारताने घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध सलग 7वी एकदिवसीय मालिका जिंकली

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती