टीम इंडियाचा धमाकेदार विजय

सोमवार, 16 जानेवारी 2017 (09:53 IST)
पुणे- कर्णधार विराट कोहलीच्या आणि त्याचा मराठमोळा शिलेदार केदार जाधव या दोघांनीही जबरजस्त शतके ठोकून, पुण्याच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंडचा तीन गड्यांनी पराभव केला. शतकी खषळी करणारा केदार जाधव सामनावीर ठरला.
 
पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारतीय गोलंदाजांची धुलाई करून 50 षयकांत 7 बाद 350 धावांचा डोंगर उभा केला होता परंतू विराट आणि केदारने पाचव्या विकेटसाठी 147 चेंडूत 200 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा तो डोंगर लिलयासर केला.
 
विराटने वनडे सामन्यांच्या कारकीर्दीतले सत्ताविसावे शतक ठोकले तर केदारने वनडे सामन्यातील दुसरे शतक साजरे केले. विराटने 105 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांसह 122 धावांची तर केदारने 76 चेंडूंमध्येच 12 चौकार आणि चार षटकारांसह 120 धावांची दणदणीत खेळी केली.

वेबदुनिया वर वाचा