लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या डावाची सुरुवात चांगली झाली. पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांच्यात पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी झाली.या सामन्यात हसरंगाने तीन, असलंकाने शून्य, रमेश मेंडिसने तीन, कामिंदू मेंडिसने एक, विक्रमसिंघेने चार*, महिश टेकशानाने शून्य आणि असिथा फर्नांडोने एक* धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारतीय संघ या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसला. या सामन्यात शुभमन गिलने 39 धावा, शिवम दुबेने 13 धावा, रायन परागने 26 धावा, वॉशिंग्टन सुंदरने 25 धावा, मोहम्मद सिराजने शून्य धावा आणि रवी बिश्नोईने आठ* धावा केल्या. श्रीलंकेकडून महिष तेक्षानाने तीन तर वानिंदू हसरंगाने दोन गडी बाद केले. त्याचवेळी विक्रमसिंघे, असिथा फर्नांडो आणि रमेश मेंडिस यांना प्रत्येकी एक यश मिळाले.