शास्त्रींना बीसीसीआयची क्लीन चिट?

मंगळवार, 3 नोव्हेंबर 2015 (10:42 IST)
नवी‍ दिल्ली- सुधीर नाईक यांच्या तक्रारीनंतरही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ रवी शास्त्री यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करणार नसल्याचेच संकेत मिळत आहे. यजमान संघाने अनुकूल खेळपट्टीचा आग्रह धरणे यात काहीच गैर नाही, असे सांगत शास्त्री: तसेच गोलंदाजीचे मार्गदर्शक भारत अरुण यांना माफ केल्याचे समजते.

मुंबईतील लढतीच्या वेळी आफ्रिकेचा डावा झाल्यानंतर शास्त्री यांनी आपल्याला उद्देशून अपशब्द वापरल्याचा आरोप सुधीर नाईक यांनी केला होता. तसेच त्यांनी याबाबतचे पत्रही भारतीय मंडळास लिहिले आहे. फिरकीस अनुकूल खेळपट्टी हवी असल्याचे संघव्यवस्थापनाने मुंबई संघटनेस कळवले होते. ही खेळपट्टी तयार केली नाही, हा दोष संघटनेचा आहे: त्यामुळे हे प्रकरण ताणण्यात अर्थ नाही, असे मंडळाचे मत असल्याचे सांगितले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा