रोहितच्या धडाकेबाज शतकाने भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हान दिले. शिखर धवनला धावचीत केलेल्या रोहित शर्माने याची पुरेपूर भरपाई करताना भारत किमान द्विशतकी मजल मारणार हे निश्चित केले. त्याने 39 चेंडूंत अर्धशतक, तसेच 61 चेंडूंत शतक करताना आफ्रिका गोलंदाजांना स्थिरावूच दिले नाही. विराट कोहलीसारखा आक्रमक सहकारी असूनही दोघांच्या शतकी भागीदारीत विराटचा वाटा 36 धावांचाच होता.