टीम इंडियाने उभारली विजयाची गुढी

सोमवार, 31 मार्च 2014 (12:19 IST)
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात रविवारी ऑस्ट्रेलियावर 73 धावांनी मात करत टीम इंडियाने विजयाची गुढी उभारली.
युवराजसिंगचे(60) शानदार अर्धशतक आणि आर.अश्विनने घेतलेले चार बळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियावर सहज विजय मिळवला. 
 
टी-20 स्पर्धेत भारतीय संघाने उपांतपूर्व फेरीत धडक दिली आहे. येत्या चार एप्रिलला दक्षिण ऑफ्रिकेविरुद्ध भारताची लढत होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा