टीम इंडियाचे स्थान घसरले

शनिवार, 10 ऑक्टोबर 2015 (12:20 IST)
भारताला दक्षिण आफ्रिकेबरोबर दोन टी-20 सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने दोन स्थानाचे टीम इंडियाचा नंबर खाली गेलाय. त्यामुळे भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. टी-20 मालिकेत पहिल्या दोन सामने हरण्याची किमया टीम इंडियाने केलेय. तिसरा सामना पावसामुळे होऊ शकलेला नाही. त्यामुळे ही मालिका दक्षिण आफ्रिकेने खिशात टाकली आहे. ही माकिला सुरु होण्याआधी भारत  आयसीसी रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर होता. दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकून आपल्या स्थानात प्रगती केली. 

वेबदुनिया वर वाचा