युवा फलंदाज विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या (139 धावा) जोरावर रविवारी जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकावर तीन गडी आणि आठ चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने श्रीलंकेचा सूपडा साफ करून 5-0 ने एकदिवसीय मालिका खिशात घातली. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले 287 धावांचे आव्हान टीम इंडियाने सात विकेटवर 288 धावा केल्या.
भारताच्या अवघ्या 64 धावांवर भारताचे दोन गडी बाद झाल्यामुळे संघात अस्वस्थता पसरली होती. मात्र, कोहलीने 'विराट' खेळीच्या जोरावर श्रीलंकेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला सामना खेळणारा केदार जाधव याने 20 धावा केला. मेंडीसने त्याला क्लिनबोल्ड केले. बिन्नी आणि आर. आश्विन यांनाही मेंडीस यानेच तंबूत पाठवले.